कृष्ण बाप्पानं नमवलं कालिया नागाला


This story is from Shrimadbhagwat tenth Skhandha and 16th Chapter

श्रीशुक उवाच
विलोक्य दूषितां कृष्णां कृष्णः कृष्णहिना विभुः । तस्या विशुद्धिमन्विच्छन् सर्प तमुदवासयत् ।।१
राजोवाच
कथमन्तर्जलेऽगाधे न्यगृह्णाद् भगवानहिम् । स वै बहुयुगावासं यथाऽऽसीद् विप्र कथ्यताम् ।।२
ब्रह्मन् भगवतस्तस्य भूम्नः स्वच्छन्दवर्तिनः । गोपालोदारचरितं कस्तृप्येतामृतं जुषन् ।।३
श्रीशुक उवाच
कालिन्द्यां कालियस्यासीद्धदः कश्चिद् विषाग्निना । श्रप्यमाणपया यस्मिन् पतन्त्युपरिगाः खगाः ।।४
विप्रुष्मता विषोदोर्मिमारुतेनाभिमर्शिताः । म्रियन्ते तीरगा यस्य प्राणिनः स्थिर जङ्गमाः ।।५
तं चण्डवेगविषवीर्यमवेक्ष्य तेन दुष्टां नदीं च खलसंयमनावतारः ।
कृष्णः कदम्बमधिरुह्य ततोऽतितुङ्ग-मास्फोट्य गाढरशनो न्यपतद् विषोदे ।।६
सर्पहृदः पुरुषसारनिपातवेग-संक्षोभितोरगविषोच्छ्वसिताम्बुराशिः ।
पर्यक् प्लुतो विषकषायविभीषणोर्मि-र्धावन् धनुःशतमनन्तबलस्य किं तत् ।।७
तस्य हृदे विहरतो भुजदण्डघूर्ण-वार्घोषमङ्ग वरवारणविक्रमस्य । आश्रुत्य तत् स्वसदनाभिभवं निरीक्ष्य चक्षुःश्रवाः समसरत्तदमृष्यमाणः ।।८
तं प्रेक्षणीयसुकुमारघनावदातं श्रीवत्सपीतवसनं स्मितसुन्दरास्यम् । क्रीडन्तमप्रतिभयं कमलोदराङ्घ्रिं सन्दश्य मर्मसु रुषा भुजया चछाद ।।९
तं नागभोगपरिवीतमदृष्टचेष्ट-मालोक्य तत्प्रियसखाः पशुपा भृशार्ताः
कृष्णेऽर्पितात्मसुहृदर्थकलत्रकामा दुःखानुशोकभयमूढधियो निपेतुः ।।१०
गावो वृषा वत्सतर्यः क्रन्दमानाः सुदुःखिताः । कृष्णे न्यस्तेक्षणा भीता रुदत्य इव तस्थिरे ।।११
अथ व्रजे महोत्पातास्त्रिविधा ह्यतिदारुणाः । उत्पेतुर्भुवि दिव्यात्मन्यासन्नभयशंसिनः ।।१२
तानालक्ष्य भयोद्विग्ना गोपा नन्दपुरोगमाः । विना रामेण गाः कृष्णं ज्ञात्वा चारयितुं गतम् ।।१३
तैर्दुर्निमित्तैर्निधनं मत्वा प्राप्तमतद्विदः । तत्प्राणास्तन्मनस्कास्ते दुःखशोकभयातुराः ।।१४
आबालवृद्धवनिताः सर्वेऽङ्ग पशुवृत्तयः । निर्जग्मुर्गोकुलाद् दीनाः कृष्णदर्शनलालसाः ।।१५
तांस्तथा कातरान् वीक्ष्य भगवान् माधवो बलः । प्रहस्य किंचिन्नोवाच प्रभावज्ञोऽनुजस्य सः ।।१६
तेऽन्वेषमाणा दयितं कृष्णं सूचितया पदैः । भगवल्लक्षणैर्जग्मुः पदव्या यमुनातटम् ।।१७
ते तत्र तत्राब्जयवांकुशाशनि-ध्वजोपपन्नानि पदानि विश्पतेः ।
मार्गे गवामन्यपदान्तरान्तरे निरीक्षमाणा ययुरंग सत्वराः ।।१८
अन्तर्हदे भुजगभोगपरीतमारात् कृष्णं निरीहमुपलभ्य जलाशयान्ते । गोपांश्च मूढधिषणान् परितः पशुंश्च संक्रन्दतः परमकश्मलमापुरार्ताः ।।१९
गोप्योऽनुरक्तमनसो भगवत्यनन्ते तत्सौहृदस्मितविलोकगिरः स्मरन्त्यः । ग्रस्तेऽहिना प्रियतमे भृशदुःखतप्ताः शून्यं प्रियव्यतिहृतं ददृशुस्त्रिलोकम् ।।२०
ताः कृष्णमातरमपत्यमनुप्रविष्टां तुल्यव्यथाः समनुगृह्य शुचः स्रवन्त्यः ।
तास्ता व्रजप्रियकथाः कथयन्त्य आसन् कृष्णाननेऽर्पितदृशो मृतकप्रतीकाः ।।२१
कृष्णप्राणान्निर्विशतो नन्दादीन् वीक्ष्य तं हृदम् । प्रत्यषेधत् स भगवान् रामः कृष्णानुभाववित् ।।२२
इत्थं स्वगोकुलमनन्यगतिं निरीक्ष्य सस्त्रीकुमारमतिदुःखितमात्महेतोः ।
आज्ञाय मर्त्यपदवीमनुवर्तमानः स्थित्वा मुहूर्तमुदतिष्ठदुरंगबन्धात् ।।२३
तत्प्रथ्यमानवपुषा व्यथितात्मभोग-स्त्यक्त्वोन्नमय्य कुपितः स्वफणान् भुजङ्गः। तस्थौ श्वसञ्छ्वसनरन्ध्रविषाम्बरीष-स्तब्धेक्षणोल्मुकमुखो हरिमीक्षमाणः ।।२४
तं जिह्वया द्विशिखया परिलेलिहानं द्वे सृक्किणी ह्यतिकरालविषाग्निदृष्टिम् । क्रीडन्नमुं परिससार यथा खगेन्द्रो बभ्राम सोऽप्यवसरं प्रसमीक्षमाणः ।।२५
एवं परिभ्रमहतौजसमुन्नतांस-मानम्य तत्पृथुशिर: स्वधिरूढ आद्यः । तन्मूर्धरत्ननिकरस्पर्शातिताम्र-पादाम्बुजोऽखिलकलादिगुरुर्ननर्त ।।२६
तं नर्तुमुद्यतमवेक्ष्य तदा तदीय-गन्धर्वसिद्धसुरचारणदेववध्वः । प्रीत्या मृदङ्गपणवानकवाद्यगीत-पुष्पोपहारनुतिभिः सहसोपसेदुः ।।२७
यद् यच्छिरो न नमतेऽङ्ग शतैकशीर्ष्ण-स्तत्तन् ममर्द खरदण्डधरोऽङ्घ्रिपातैः । क्षीणायुषो भ्रमत उल्बणमास्यतोऽसृङ् नस्तो वमन् परमकश्मलमाप नागः ।।२८
तस्याक्षिभिर्गरलमुद्वमतः शिरस्सु यद् यत् समुन्नमति निःश्वसतो रुषोच्चैः ।
नृत्यन् पदानुनमयन् दमयाम्बभूव पुष्पैः प्रपूजित इवेह पुमान् पुराणः ।।२९
तच्चित्रताण्डवविरुग्णफणातपत्रो रक्तं मुखैरुरु वमन् नृप भग्नगात्रः ।
स्मृत्वा चराचरगुरुं पुरुषं पुराणं नारायणं तमरणं मनसा जगाम ।।३०
कृष्णस्य गर्भजगतोऽतिभरावसन्नं पाष्र्णिप्रहारपरिरुग्णफणातपत्रम् ।
दृष्ट्वाहिमाद्यमुपसेदुरमुष्य पत्न्य आर्ताः श्लथद्वसनभूषणकेशबन्धाः ।।३१
तास्तं सुविग्नमनसोऽथ पुरस्कृतार्भाः कायं निधाय भुवि भूतपतिं प्रणेमुः ।
साध्व्यः कृताञ्जलिपुटाः शमलस्य भर्तु-र्मोक्षेप्सवः शरणदं शरणं प्रपन्नाः ।।३२
नागपत्न्य ऊचुः
न्याय्यो हि दण्डः कृतकिल्बिषेऽस्मिं-स्तवावतारः खलनिग्रहाय ।
रिपोः सुतानामपि तुल्यदृष्टे-र्धत्से दमं फलमेवानुशंसन् ।।३३
अनुग्रहोऽयं भवतः कृतो हि नो दण्डोऽसतां ते खलु कल्मषापहः ।
यद् दन्दशूकत्वममुष्य देहिनः क्रोधोऽपि तेऽनुग्रह एव सम्मतः ।।३४
तपः सुतप्तं किमनेन पूर्व निरस्तमानेन च मानदेन ।
धर्मोऽथ वा सर्वजनानुकम्पया यतो भवांस्तुष्यति सर्वजीवः ।।३५
कस्यानुभावोऽस्य न देव विद्महे तवाङ्घ्रिरेणुस्पर्शाधिकारः ।
यद्वाञ्छया श्रीर्ललनाऽऽचरत्तपो विहाय कामान् सुचिरं धृतव्रता ।।३६
न नाकपृष्ठं न च सार्वभौमं न पारमेष्ठ्यं न रसाधिपत्यम् । न योगसिद्धीरपुनर्भवं वा वाञ्छन्ति यत्पादरजः प्रपन्नाः ।।३७
तदेष नाथाप दुरापमन्यै-स्तमोजनिः क्रोधवशोऽप्यहीशः ।
संसारचक्रे भ्रमतः शरीरिणो यदिच्छतः स्याद् विभवः समक्षः ।।३८
नमस्तुभ्यं भगवते पुरुषाय महात्मने ।
भूतावासाय भूताय पराय परमात्मने ।।३९
ज्ञानविज्ञाननिधये ब्रह्मणेऽनन्तशक्तये । अगुणायाविकाराय नमस्तेऽप्राकृताय च ।।४०
कालाय कालनाभाय कालावयवसाक्षिणे । विश्वाय तदुपद्रष्ट्रे तत्कर्ते विश्वहेतवे ।।४१
भूतमात्रेन्द्रियप्राणमनोबुद्धयाशयात्मने । त्रिगुणेनाभिमानेन गूढस्वात्मानुभूतये ।।४२
नमोऽनन्ताय सूक्ष्माय कूटस्थाय विपश्चिते । नानावादानुरोधाय वाच्चवाचकशक्तये ।।४३
नमः प्रमाणमूलाय कवये शास्त्रयोनये । प्रवृत्ताय निवृत्ताय निगमाय नमो नमः ।।४४
नमः कृष्णाय रामाय वसुदेवसुताय च । प्रद्युम्नायानिरुद्धाय सात्वतां पतये नमः ।।४५
नमो गुणप्रदीपाय गुणात्मच्छादनाय च । गुणवृत्त्युपलक्ष्याय गुणद्रष्ट्रे स्वसंविदे ।।४६
अव्याकृतविहाराय सर्वव्याकृतसिद्धये । हृषीकेश नमस्तेऽस्तु मुनये मौनशीलिने ।।४७
परावरगतिज्ञाय सर्वाध्यक्षाय ते नमः । अविश्वाय च विश्वाय तद्दष्ट्रेऽस्य च हेतवे ।।४८
त्वं ह्यस्य जन्मस्थितिसंयमान् प्रभो गुणैरनीहोऽकृत कालशक्तिधृक् । तत्तत्स्वभावान् प्रतिबोधयन् सतः समीक्षयामोघविहार ईहसे ।।४९
तस्यैव तेऽमूस्तनवस्त्रिलोक्यां शान्ता अशान्ता उत मूढयोनयः । शान्ताः प्रियास्ते ह्यधुनावितुं सतां स्थातुश्च ते धर्मपरीप्सयेहतः ।।५०
अपराधः सकृद् भर्त्रा सोढव्यः स्वप्रजाकृतः । क्षन्तुमर्हसि शान्तात्मन् मूढस्य त्वामजानतः ।।५१
अनुगृह्णीष्व भगवन् प्राणांस्त्यजति पन्नगः । स्त्रीणां नः साधुशोच्यानां पतिः प्राणः प्रदीयताम् ।।५२
विधेहि ते किङ्करीणामनुष्ठेयं तवाज्ञया । यच्छ्रद्धयानुतिष्ठन् वै मुच्यते सर्वतोभयात् ।।५३
श्रीशुक उवाच
इत्थं स नागपत्नीभिर्भगवान् समभिष्टुतः । मूर्च्छितं भग्नशिरसं विससर्जाङ्घ्रिकुट्टनैः ।।५४
प्रतिलब्धेन्द्रियप्राणः कालियः शनकैर्हरिम् । कृच्छ्रात् समुच्छ्वसन् दीनः कृष्णं प्राह कृताञ्जलिः ।।५५
कालिय उवाच
वयं खलाः सहोत्पत्त्या तामसा दीर्घमन्यवः । स्वभावो दुस्त्यजो नाथ लोकानां यदसद्ग्रहः ।।५६
त्वया सृष्टमिदं विश्वं धातर्गुणविसर्जनम् । नानास्वभाववीर्योंजोयोनिबीजाशयाकृति ।।५७
वयं च तत्र भगवन् सर्पा जात्युरुमन्यवः । कथं त्यजामस्त्वन्मायां दुस्त्यजां मोहिताः स्वयम् ।।५८
भवान् हि कारणं तत्र सर्वज्ञो जगदीश्वरः ।
अनुग्रहं निग्रहं वा मन्यसे तद् विधेहि नः ।।५९
श्रीशुक उवाच
इत्याकर्ण्य वचः प्राह भगवान् कार्यमानुषः । नात्र स्थेयं त्वया सर्प समुद्रं याहि मा चिरम् । स्वज्ञात्यपत्यदाराढ्यो गोनृभिर्भुज्यतां नदी ।।६०
य एतत् संस्मरेन्मर्त्यस्तुभ्यं मदनुशासनम् । कीर्तयन्नुभयोः सन्ध्योर्न युष्मद् भयमाप्नुयात् ।।६१
योऽस्मिन् स्नात्वा मदाक्रीडे देवादींस्तर्पयेज्जलैः । उपोष्य मां स्मरन्नर्चेत् सर्वपापैः प्रमुच्यते ।।६२
द्वीपं रमणकं हित्वा हृदमेतमुपाश्रितः ।
यद्भयात् स सुपर्णस्त्वां नाद्यान्मत्पादलाञ्छितम् ।।६३
श्रीशुक उवाांच
एवमुक्तो भगवता कृष्णेनाद्भुतकर्मणा । तं पूजयामास मुदा नागपत्न्यश्च सादरम् ।।६४
दिव्याम्बरस्रङ्मणिभिः परार्यैरपि भूषणैः । दिव्यगन्धानुलेपैश्च महत्योत्पलमालया ।।६५
पूजयित्वा जगन्नाथं प्रसाद्य गरुडध्वजम् । ततः प्रीतोऽभ्यनुज्ञातः परिक्रम्याभिवन्द्य तम् ।।६६
सकलत्रसुहृत्पुत्रो द्वीपमब्धेर्जगाम ह । तदैव सामृतजला यमुना निर्विषाभवत् । अनुग्रहाद् भगवतः क्रीडामानुषरूपिणः ।।६७

दशमस्कंन्ध अध्याय १६
श्री शुक म्हणाले
१ कालिया नागाने यमुना नदी दूषित केल्याचे भगवान कृष्णाने पाहिले आणि ती शुद्ध करण्याचा त्यांनी निश्चय केला व त्या नागाला भगवान कृष्णाने तेथून हुसकावून लावले.

परीक्षित राजा म्हणाला
२ हे ब्रह्मन्! इतक्या अघाद पाण्यात भगवंतांनी या नागाला कसे पकडले? आणि इतका दीर्घकाळ तो राहिला कसा तेथे? कृपया मला सांगावे.

३ हे ब्रह्मन्! सर्वव्यापी भगवंत आपल्या इच्छेनुसार वागू शकतात. गोपाल रूपातील लीलाचरिताचे सेवन करताना कुणाची तृप्ती होईल का?

श्री शुक म्हणाले
४ यमुना नदीत कालिया नागाचा एक डोह होता. विषयाच्या आगीने त्यातील पाणी उकळत असे. डोहावरून उडणारे पक्षी त्या पाण्यात पडत असत.

५ या डोहातील विषारी पाण्याच्या लाटांवरून वारा वहायचा. तेव्हा त्या पाण्याचे तुषार त्या वाऱ्याबरोबर उडून येत, तेव्हा यमुनेच्या तीरावरील झाडे इ. स्थावर आणि गाई इत्यादी जंगम असे सगळे प्राणी होरपळून मरून जात होते.

६ प्रचंड वेग असणाऱ्या विषाची ताकद आणि त्यामुळे दूषित झालेली नदी भगवंतांनी पाहिली. भगवान कृष्णाचा अवतारच दुष्टांचे दमन करण्यासाठी होता. म्हणून ते अतिशय उंच अशा कदंबाच्या झाडावर चढले, त्यांनी कंबर शेल्याने आवडली आणि मोठा आवाज करून मांड्या थोपटल्या आणि त्या विषारी पाण्यात उडी मारली.

७ नाग असलेल्या त्या डोहातील पाणी सापाच्या विषारी उच्छ्वासामुळे उसळत होते. तसेच भगवंताच्या बलशाली उडीच्या वेगामुळे ही उसळू लागले. ते चहूबाजूंनी उसळू लागले, विषामुळे लालपिवळ्या भयकारी लाटा त्यावर उसळू लागल्या. शंभर धनुष्ये अंतरापर्यंत ते पाणी वाहू लागले. पण अनंत सामर्थ्य असणाऱ्या भगवंताला त्याचे काय?

८ परीक्षिता! तो मग पाण्यात पोहायला लागला. दंडासारख्या त्याच्या बाहूंमुळे पाणी घुसले जायला लागले. एखाद्या बलदंड हत्तीसारखा तो पाणी कापत पुढे चालला होता. नागाने तो आवाज ऐकला आणि आपल्या निवासस्थानावर कोणीतरी चालून येत आहे हे त्या नागाला दिसले. ते त्याला सहन झाले नाही, तोही पुढे चालून गेला.

९ तेव्हा त्याला अतिशय सुंदर आणि सुकुमार असा मुलगा दिसला. त्याची कांती काळ्या ढगासारखी तजेलदार होती. त्याच्या छातीवर श्रीवत्सचिन्ह होते आणि त्याने पिवळे रेशमीवस्त्र परिधान केले होते. त्याच्या सुंदर मुखावर स्मितहास्य विलसत होते. निर्भयपणे तो खेळत होता. कमळाच्या गाभ्यासारखी त्याची पावले सुकुमार होती. रागाने तो नात्या मुलाच्या मर्मस्थानी डसला आणि आपल्या वेटोळ्यात त्याला झाकून टाकले.

१० कृष्णाला नागाने आपल्या वेटोळ्याने पूर्ण वेढून टाकले आहे आणि त्याच्या ठिकाणी काहीही हालचाल दिसत नाही. हे पाहून त्याचे प्रिय मित्र गोपाळ अत्यंत व्याकुळ झाले. कारण त्यांनी स्वतःला तसेच आपले मित्र, आपली धनसंपत्ती, पत्नी आणि आपल्या सर्व इच्छा कृष्णाच्या ठायी वाहिल्या होत्या. त्यांना दुःख झाले, शोक झाला, मनात भीती दाटून आली आणि बुद्धी कुंडीत होऊन ते जमिनीवर कोसळले.

११ विविध वयाच्या गायी, बैल, वासरे जवळ असलेल्या गाई हे सर्व फार दुःखी झाले आणि हंबरडे फोडायला लागले. त्यांचे डोळे कृष्णावर केले होते आणि त्या अश्रू ढाळत उभ्या राहिल्या.

१२ इकडे व्रजामध्ये भूमीवर, अंतरिक्षात आणि शरीरातही असे तीन ठिकाणी तीन प्रकारचे फार मोठमोठे भयंकर उत्पात घडू लागले. ते भयाचे सूचना करू लागले.

१३ ते पाहून नंद वगैरे सर्व गोपांचा भीतीने थरका उडाला. बलरामाशिवाय कृष्ण एकटाच गाई चरायला घेऊन गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

१४ कृष्ण त्यांचा प्राण होता. तो त्यांचे मनही होताच. त्यामुळे त्या अपशकुनांमुळे कृष्णावरील प्राणसंकटांची कल्पना करून ते दुःख, शोक आणि भयाने व्याकुळ झाले.

१५ अरे राजा! लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळे स्त्री पुरुष गोप गोपी अगदी केविलवाणे झाले आणि कृष्णाला पाहण्यास आतुर होऊन गोकुळातून बाहेर पडले.

१६ त्यांना असे घाबरून गेलेले पाहून भगवान बलराम - जो जणु दुसरा माधवच होता. काहीही न बोलता हळूच हसू लागला. त्याला आपल्या धाकट्या भावाचा प्रभाव पुरेपुर माहीत होता.

१७ प्रिय कृष्णाच्या दिव्य चिन्हे असलेल्या पावलांचा मागवा घेत घेत ते पायवाटेने यमुनेच्या तीरावर येऊन पोचले.

१८ वाटेत गाईंच्या खुरांच्या चिन्हांबरोबरच इतरांची ही पदचिन्हे होती. त्यात विश्वनियामकाच्याही पावलांचे ठसे होते. त्यावर कमळ, यव, अंकुश, वज्र आणि ध्वज यांचे चिन्हे होती. ती चिन्हे पहात पहात ते अगदी घाईघाईने चालले होते.

१९ डोहात सापाच्या विख्यात काहीही हालचाल न करता निश्चित असलेला कृष्ण त्यांना लांबूनच दिसला आणि डोहाच्या काठावर दीनवाणी व्याकुळ गोफ आणि त्यांच्या समवेत पशूही आक्रंदन करीत होते. गोपांची बुद्धी कुंठित झाली होती.

२० अनंत भगवंताच्या ठाई गोपींचे मन अनुरक्त झाले होते. त्याची सुजनता, त्याचे स्मित, त्याचे बघणे, त्याचे बोलणे या सगळ्यांची त्यांना आठवण होत होती. आपला लाडका कृष्ण नागाच्या पाशात अडकल्यावर त्या अत्यंत दुःखव्याकुळ झाल्या. आपला लाडका कृष्ण नसलेले त्रैलोक्य त्यांना शून्य वाटू लागले.

२१ आपल्या पुत्राच्या मागोमाग यमुनेत शिरायला निघालेल्या कृष्णाच्या मातेला त्या गोपींनी पकडून ठेवले. त्यांचंही दुःख तिच्यासारखेच होते. त्यांच्या डोळ्यातून जणू शोक वाहत होता. गोकुळातल्या गोष्टी त्या एकमेकींना सांगत होत्या. त्यांच्या नजरा कृष्णावर केल्या होत्या. काही जणी तर मृतवत् पडल्या होत्या.

२२ कृष्ण जीव की प्राण असणारे नंदादी गोप त्या डोहात शिरू लागले पण कृष्णाचा प्रभाव माहीत असलेल्या बलरामाने त्यांना तसे करण्यापासून रोखले.

२३ अशाप्रकारे गोकुळाला आपल्या व्यतिरिक्त अन्य काही गतीच नाही हे कृष्णाच्या लक्षात आले. आपल्या कारणे गोकुळातील स्त्रिया, मुले सर्वच अतिशय दुःखी झाले आहेत, हे जाणून मनुष्याप्रमाणे वागणारा कृष्ण थोड्यावेळ तसाच स्थिर राहिला आणि मग एकदम त्या नागाच्या विळख्यातून वर उभा राहिला.

२४ कृष्णाच्या फुगत चाललेल्या शरीरामुळे नागाच्या शरीराला वेदना होऊ लागल्या. तो संतापला, त्याने आपला वेळ खास सोडून दिला आणि आपला फणा उभारून तो फुत्कारू लागला. त्यामुळे त्याचे नाक म्हणजे उष्ण विषयाची भट्टीच झाले होते. त्याने डोळे वटारले आणि त्याचा चेहरा जळत्या लाकड्यासारखा दिसायला लागला. टक लावून तो कृष्णाकडे बघत होता.

२५ आपल्या दोन टोके असलेल्या जिभेने तो नाक ओठाचे कोपरे चाटत होता. त्याची नजरेतून भयंकर विषारी आग बाहेर पडत होती. गरुडासारखा कृष्ण त्या नागाशी खेळत होता आणि इकडे तिकडे सुळ्ळकन पळत होता. तो नाक सुद्धा दंश करण्याच्या संधीची वाट पाहत गोल गोल फिरत होता.

२६ अशाप्रकारे त्याला फिरवून फिरवून त्या नागाची शक्ती कृष्णाने नष्ट करून टाकली. त्याचा उंच फणा त्याने वाकविला आणि त्याच्या विशाल पाण्यावर तो आरुढ झाला.
नागाच्या फळ्यावरील अनेक रत्नांचे स्पर्श त्याच्या चरणांना होत होते. त्यामुळे त्याचे चरण कमळ तांबूस झाले आणि सकल कलांचा अधिगुरू कृष्ण नागाच्या पाण्यावर नृत्य करू लागला.

२७ आता तो नृत्य करणार असे पाहून त्याचे भक्त, गंधर्व, सिद्ध, सुर, कारण आणि देव यांच्या स्त्रिया मोठ्या लगबगीने तिथे आल्या. मोठ्या प्रेमाने मृदंग, प्रणव, आनक ही वाद्ये त्या वाजवीत होत्या‌, गीत गात होत्या, फुलांच्या भेटी आणल्या होत्या आणि वरचेवर स्तुती करत होत्या.

२८ नागाला एकशे एक फणा होत्या. जी जी फणा तो वाकवत नव्हता, ती ती फणा तो कठोर शासक आपल्या पायाने दाबून टाकीत होता. त्याची शक्ती क्षीण झाली. नाकातोंडातून तो खूप रक्त ओकायला लागला. त्याला चक्कर आली आणि तो निश्चेष्ठ होऊ लागला‌.

२९ नाग डोळ्यातून गरळ ओकत होता. संतापाने जोरजोरात फुत्कार सोडत होता. त्याच्या फणांपैकी जी जी फणा तो वर उचलीत असे ती ती कृष्ण आपल्या पायाने वाकून दाबून टाकीत असे. नागाचे रक्त कृष्णाच्या पायावर पडल्यामुळे असे वाटत होते की जणु काही पुराण पुरुषाची फुलांनी पूजा केली आहे.

३० हे राजा! कृष्णाच्या त्या बहारदार तांडव नृत्यामुळे नागाचे पण आरोपी छत्र पार छिन्नविच्छिन्न झाले. त्याचे शरीर घायाळ झाले. तो रक्त ओकू लागला. मग त्याने चराचराचा गुरु असलेल्या पुराणपुरुष नारायणाचे स्मरण केले आणि त्याला तो मनोमन शरण गेला.

३१ ज्याच्या उदरात सर्व विश्व सामावले आहे अशा कृष्णाच्या बलशाली पादाघातांमुळे तो नाक दबला गेला. कृष्णाच्या टाचांच्या प्रहारांमुळे त्याचे फणांचे छत्र पार छिन्नविछिन्न झाले. नागाला अशा अवस्थेत पाहून नागपत्न्या अतिशय दुःखार्त झाल्या. अति दुःखाने त्यांची वस्त्रे विस्कटली, अलंकार गळून पडले आणि केस मोकळे झाले त्या सर्वजणी मग आदि देव कृष्णाला शरण गेल्या.

३२ त्या नागपत्न्या मनातून खूप घाबरून गेल्या होत्या. मग त्यांनी आपल्या लहान मुलांना पुढे घातले. चराचराच्या स्वामीला त्यांनी दंडवत प्रणाम केला. पतीची पापातून सुटका व्हावी म्हणून त्या साध्वी स्त्रिया आश्रय दात्या कृष्णाला हात जोडून शरण गेल्या.

नागपत्न्या म्हणाल्या-
३३ या अपराध्याला तुम्ही जे शासन करता आहात ते योग्यच आहे. कारण दुष्टांना शासन करणे यासाठीच आपला अवतार आहे. शत्रु आणि पुत्र या दोघांच्या बाबतीत तुम्ही समान दृष्टी ठेवता. आपण केलेले शासन हे फलस्वरूपच आहे.

३४ आमच्यावरही आपली कृपाच आहे. दुष्टांना केलेले शासन त्यांच्या पापांचा नाश करते. या जीवाची ही सर्प योनी असल्याने त्याच्यावरचा आपला राग म्हणजे अनुग्रहच मानला पाहिजे.

३५ सर्व पाश निरस्तकरून आणि दुसऱ्याचा मान देऊन याने पूर्वजन्मी तप केले असावे किंवा सर्व जीव मात्रांवर दया करून त्याने धर्म केला असावा. कारण सर्वांचे जीव स्वरूप असलेले आपण यावर संतुष्ट झाला आहात.

३६ हे प्रभो! आपल्या पद धुलीचा स्पर्श घेण्याचा अधिकार याला मिळाला, हा कोणाचा प्रभाव आहे, हे आम्हाला कळत नाही, ज्या चरण धुळीच्या स्पर्शासाठी सुंदर लक्ष्मीने सुद्धा सर्व उपभोगांचा त्याग करून कठोर व्रताचे पालन करीत तपश्चर्या केली होती.

३७ आपल्या चरण धुलीचा स्पर्श ज्यांना होतो, त्यांना स्वर्गाची इच्छा नसते, सार्वभौम सत्तेची कामना नसते, पारमेष्ट्य आणि पृथ्वीच्या राज्याची लालसा नसते. योगाने प्राप्त होणाऱ्या सिद्धीही त्याला नकोशा असतात. एवढेच काय मुक्तीची सुद्धा इच्छा नसते.

३८ इतरांना दु:साध्य असणारे चरणरज याला मिळाले. खरे तर हा नागराज तामसी योनीत जन्माला आला असल्याने अत्यंत क्रोधी आहे. तरीपण संसार चक्रामध्ये जे जीव फिरत असतात त्यांनी या चरण रजाची इच्छा केली तरी त्यांना प्रत्यक्ष वैभव प्राप्त होते.

३९ आम्ही आपणास नमस्कार करीत आहोत. आपण भगवान आहात, आदि पुरुष आहात, महात्मा आहात. सर्व भूतमात्रे आपल्या ठिकाणी आहेत आणि आपण सर्व भूतमात्रांच्या ठाई आहात. आपण भूतमात्रांच्याही पलीकडे असणारा परमात्मा आहात. आपणास नमस्कार असो!

४० आपण ज्ञान आणि विज्ञानाचा निधी आहात. आपली शक्ती अनंत आहे. तुम्ही निर्गुण आणि निर्विकार ब्रह्म आहात आणि आदिम आहात. आम्ही आपणास नमस्कार करीत आहोत.

४१ आपण साक्षात काल आहात, पण प्रत्यक्ष काल आपल्या नभीतून उत्पन्न झाला आहे. आपण विश्वस्वरूपही आहात, विश्वाचा द्रष्टा आहात, विश्वाचा करता आहात आणि विश्वाचा हेतू पण आहात.

४२ आपण पंचमहाभूते आणि त्यांच्या शब्द, स्पर्श, रूप, रसगंध या तन्मात्रा आहात. तसेच इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी आणि चित्तही आहात. आपण त्रिगुणही आहात आणि तरीसुद्धा स्वतःच्या स्वरूपाच्या साक्षात्काराला आपण झाकून ठेवल्या आहे. आपणास नमस्कार असो.

४३ आपण अनंत आहात आणि सूक्ष्मही आहात. आपण कुटस्थ आहात आणि ज्ञानमय आहात. विविध वादांच्या अनुरोधाने आपण तस तसे आहात तसेच शब्दाची वाचक शक्ती आणि अर्थाची वाचत्व शक्ती ही आपण आहात. आपणास आम्ही नमस्कार करतो.

४४ प्रत्यक्ष, अनुमान, इ प्रमाणाचे मूळ आपण आहात. आपण प्रतिभाशाली ज्ञानी आहात. आपण सर्व शास्त्रांचे मूलस्थान आहात. प्रवृत्ती पर आणि निवृत्तिपर अशा दोन्ही प्रकारचे वेदं ही आपणच आहात. आपणास नमस्कार असो‌.

४५ संकर्षण राम, वासुदेव, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध हे चतुत्यर्यूह आपणच आहात. यादवांचे स्वामी कृष्ण ही आपणच आहात. आपणास नमस्कार असो. नमस्कार असो.

४६ आपण त्रिगुणांना प्रकाशित करणारे आहात आणि त्रिगुणांमुळे स्वतःला झाकून टाकणारे ही आहात. गुणांच्या वृत्तीमुळे आपण किंचित लक्षात येता. तुम्ही त्रिगुणांच्या या पसार्याचे द्रष्टेआहात आणि अत्यंत असंवेद्य आहात.

४७ आपला विहार कधीच स्पष्टपणे ज्ञात होत नाही. पण सर्व प्रकारच्या नि:संदिग्ध स्पष्टतेची स्थिती मात्र तुमच्यामुळे होते. हे हृषिकेशा! आपण मौन हा स्वभाव असणारे मुनी आहात. आपणास नमस्कार असो.

४८ स्थूल आणि सूक्ष्म गतींचे आपण ज्ञाते आहात. आपण सर्व विश्वाचे साक्षी आहात. आपण या नामरूपात्मक जगाच्या पलीकडे आहात पण विश्वच आपल्याच सामावले असल्यामुळे विश्वरूपही आहात विश्वाचे द्रष्टे आहात आणि त्याचे कारणही आहात.

४९ हे प्रभो! आपण स्वतः प्रत्यक्ष काही करीत नाही, तरीही या विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि विलय हे सर्व तुम्ही त्रिगुणांच्या द्वारे घडवतात. जीवाच्या त्या त्या स्वभाव संस्कारांना आपण दृष्टिक्षेपाने उद्दीपित करता. आपले चरित्र आहे. आपणास नमस्कार असो.

५० संपूर्ण त्रैलोक्यात तुमच्याच मूर्ती आहे. काही शांत आहेत,काही उग्र आहेत आणि काही मूढ आहेत. म्हणजेच काही सत्वगुणी आहेत, काही रजोगुणी आहेत काही तमोगुणी आहेत. पण शांतसत्वगुणी मूर्तीच आपणास प्रिय आहेत. कारण आत्ता येथे सज्जनांच्या रक्षणासाठी आणि धर्माला प्राप्त करण्यासाठी आपण येथे स्थिर झाला आहात.

५१ आमच्या पतीने केलेला आपल्या प्रजेचा अपराध आपण सहन करावा. हे शांतस्वरूपा! या मूढ आणि अज्ञानी जीवाच्या अपराधास क्षमा करावी.

५२ भगवन्! ह्या नागाचे प्राण जाऊ पाहत आहेत, याच्यावर कृपा करा. आम्ही स्त्रिया सज्जनांच्या दयेस पात्र असतो. पती हा आमचा प्राण आहे, तो आम्हाला द्यावा.

५३ आम्ही आपल्या दासी आहोत, जे काही करायचे असेल ते आम्ही आपल्या आज्ञेने करू. जो श्रद्धेने आपल्या आज्ञेचे पालन करतो, तो सर्व भयांपासून मुक्त होतो.

श्रीशुक म्हणाले-
५४ अशाप्रकारे नागपत्न्यांनी भगवंताची स्तुती केली. पायांच्या प्रहारांनी त्या नागाच्या फणा छिन्नविच्छिन्न झाल्या होत्या, तो मूर्च्छित झाला होता. भगवंतांनी त्याला मग सोडून दिले.

५५ कालियाच्या शरीरात चैतन्य आले. हळूहळू पण मोठ्या कष्टाने तो श्वासोच्छवास करू लागला. हात जोडून तो दीनवाना लाख कृष्णाला म्हणाला-

कालिया म्हणाला-
५६ भगवंता, आम्ही सर्व जन्मजात दुष्ट आहोत. तामसी आहोत आणि दीर्घकाळ राग धरून राहणारे आहोत. जन्म जात स्वभाव सोडणे फार कठीण असते. त्यामुळेच जगाला असत् म्हणजे मिथ्या गोष्टींची ओढ वाटते‌.

५७ हे विधात्या! हे त्रैगुण्यातून विश्व तुम्ही निर्माण केले आहे त्यामुळे त्यात विविध स्वभाव,शक्ती, तेज,जाती, बीजे आणि कर्माचे असलेले भूतमात्र आहेत.

५८ हे भगवंता! त्या त्या विश्वातले आम्ही सर्व जन्मजात अत्यंत कोपिष्ट आहोत. आम्ही स्वतः तुझ्या मायेने मोहित झालो आहोत, या तुझ्या मायेचा त्याग करणे अत्यंत कठीण आहे. आम्ही कसा तिचा त्याग करू?

५९ आपण जगदीश्वर आहात. सर्वज्ञ आहात. या विश्वाचे कारण आहात. दया किंवा दंड जे तुम्हाला करावेसे वाटते ते तुम्ही करता.

श्रीशुक म्हणाले-
६० कालियाचे हे बोलणे ऐकल्यावर कार्यासाठी मनुष्य रूप घेतलेले भगवंत त्याला म्हणाले, सर्पा तू आता इथे राहू नकोस. आपले ज्ञानीबांधव, मुलेबाळे आणि पत्न्या यांच्यासह तू समुद्रात जा. उशीर करू नकोस. गाई गुरे आणि माणसे यांना आता या यमुना नदीचा उपभोग घेऊ दे.

६१ तुला दिलेल्या या शिक्षेचे व आज्ञेचे जो मनुष्य सकाळ संध्याकाळ स्मरण करेल त्याला तुमच्यापासून भीती असणार नाही.

६२ जो कोणी माझ्या या क्रीडा भूमीवर स्नान करेल आणि देवाला जल अर्पण करेल व पितरांचे जलाने तर्पण करेल तसेच उपवास करून माझे स्मरण करेल तो सर्व पापांपासून मुक्त होईल.

६३ तुझ्या मस्तकावर माझी पदचिन्हे उमटली आहेत. त्यामुळे ज्याच्या भीतीमुळे तू रमण द्वीप सोडून या डोहाचा आश्रय घेऊन राहिला होतास तो गरुड तुला खाणार नाही.

श्रीशुक म्हणाले-
६४ भगवंताची कर्मे अद्भुत आहेत. त्यांनी असे म्हटल्यावर त्या कालियाने तसेच त्याच्या पत्न्यांनी त्याची आनंदाने व आदरपूर्वक पूजा केली.

६५ दिव्य वस्त्रे, माळा, रत्न,अत्यंत मौल्यवान अशी आभूषणे तसेच दिव्य गंध आणि उटी व कमळांचे मोठे हार यांच्या योगाने त्याने जगन्नाथाची पूजा केली आणि गरुड चिन्हांकित ध्वज असणाऱ्या भगवंताला प्रसन्न केले. तो कालिया ही मग आनंदित झाला. त्यांना प्रदक्षिणा घातली आणि वंदन केले.

६७ नंतर तो कालिया आपल्या पत्न्या, मित्र आणि पुत्रांसह समुद्रातील रमणक द्वीपात गेला. तेव्हापासून यमुनेचे पाणी विषरहित आणि अमृतासमान झाले.
लीलेसाठी मनुष्य रोग धारण केलेल्या भगवंताच्या कृपेमुळे.

या ठिकाणी परम हंसकृत संहिता श्रीमद् भागवत पुराण याच्या दशम स्कंधाच्या पूर्वार्धातील कालिया मोक्षण नावाचा सोळावा अध्याय पूर्ण झाला.
|| श्रीकृष्णार्पणमस्तु ||

Translation missing: mr.general.search.loading